skip to main |
skip to sidebar
Best Marathi Status For WhatsApp & Facebook
छोटे लोक नसते तर मोठ्या लोकांचे अस्तित्व शून्य असते.
शुद्ध हेतू व प्रामाणिकपणा असेल तर कोणतेही कार्य साध्य होते.
संघर्ष जितका तीव्र तितके विजयाचे मोल अधिक.
गरज नसलेल्या चैनीच्या वस्तूंकरिता माणसे उगाचच घाम गाळतात.
तारुण्यात आपण दुःख नसताना अश्रू गाळत असतो, तर वार्धक्यात अश्रू न गाळता दुःख सहन करत असतो.
रक्ताची नाती जन्माने मिळतात , मानलेली नाती मनाने जुळतात , पण नाती नसतानाही जी बंधनं जुळतात , त्या रेशीम बंधनांना "मैत्री" म्हणतात.
आवडत्या व्यक्तीला आपल्या इगोसाठी सोडण्यापेक्षा , आवडत्या व्यक्तीसाठी इगो सोडणे केव्हाही चांगले.
वेडी माणसच इतिहास लिहितात , शहाणी माणसं तर फक्त तो वाचतात.
आपल्या अपयशाचं खापर परिस्थितीवर फोडण्यापेक्षा परिस्थितीला फोडून भव्यदिव्य यश मिळवा.
श्रीमंती ही वाऱ्यावर उडून जाते , कायम टिकणारी गोष्ट एकच ; ती म्हणजे चारित्र्य.
सौंदर्य हे स्त्रीचे सामर्थ्य आहे , तर सामर्थ्य हे पुरुषाचे सौंदर्य आहे.
कधीकधी आपल्या प्रभावी वक्तव्याने शत्रूदेखील मते बदलू शकतो.
भविष्याचा सामना करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे वर्तमानावर धैर्याने आणि आत्मविश्वासाने नियंत्रण मिळवणे.
फारच थोड्यांना बुद्धिमत्ता लाभलेली असते , बहुतेकांना नुसते डोळेच असतात.
परस्परांना हात द्यायचा असतो , हात दाखवायचा नसतो.